मंगेश येवले- विदेशातून NRI लोकांना विमानात भरून आणणारे सरकार आमच्या मजुरांना कधी न्याय देणार
*नवापूर- मजुरांचा सय्यम तुटला शेकडो किलोमीटर पायपीट सुरू*
लॉकडाऊन ला जवळ जवळ महिना उलटला आहे परप्रांतात आपली उपजीविका भागवण्या साठी मजुरीकामा ला गेलेले श्रमजीवी महिन्या पासून अडकून पडले होते
देशातील केंद्र सरकार तर विदेशातून NRI लोकांना विमानात घेऊन आले परंतु आमच्या परप्रांतात कामाला गेलेल्या श्रमजीवी मजुरांना कधी आणणार ? गुजरात असो की महाराष्ट्र सरकार प्रत्येक वेळेस मजुरां ना आणान्या साठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे महिन्या पासून फक्त बोलले जात होते प्रत्यक्षात मात्र कोठेंही प्रशासना कडून प्रयत्न झाले नसल्याने अखेर मजुरांचा सय्यम तुटला असून आता आपल्या मुलां बाळा सोबत मिळेल त्या मार्गाने पायपीट करतांना दिसत आहे
गुजरात महाराष्ट्र सीमे वरील रेल्वे ट्रेक असो की महामार्गा वरून गेल्या दोन तीन दिवसा पासून मजूरआपल्या मुलां बाळांना घेऊन पायपीट करत जात आहेत यात अनेकांनी आपल्या लोकांना गमावल्याची घटना ही घडत आहे सरकार याची दखल केव्हा घेणार हा मोठा प्रश्न आहे .
Comments
Post a Comment